मुंबई: राज्यात अनेक मोर्चे, आंदोलनानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले. एसईबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. परंतु या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आले होते. दरम्यान मुंबई हायकोर्टाने याबाबत निर्णय दिला आहे. पुढील ५ डिसेंबरपर्यंत एसईबीसी प्रवर्गात भरती करण्यास स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी होईल तोपर्यंत कोणत्याही विभागात एसईबीसी प्रवर्गात भरती करू नका असे आदेश कोर्टाने दिले आहे.