Budget 2018 Live Updates

0

नवी दिल्ली: 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

  • मुंबई लोकसाठी 11 हजार कोटींची तरतूद
  • देशातील सर्वच रेल्वे आणि स्टेशन्सवर वाय फाय आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
  • देशात 10 पर्यटनस्थळं विकसित करणार
  • मुंबईतल्या एलिव्हेटेड मार्गासाठी 14 हजार कोटींची तरतूद
  • 70 लाख नव्या नोकऱ्या निर्माण करणार, नव्या कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये सरकार 12 टक्के रक्कम देणार
  • मुद्रा योजनेअंतर्गत 3 लाख कोटी रुपये कर्ज देण्याचं उद्दीष्ट
  • नोटाबंदी आणि जीएसटीमुळे कुटीर, लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये वाढ
  • 187 प्रकल्प नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत मंजूर, त्यातील 47 योजना पूर्ण झाल्या
  • 10 कोटी गरीब कुटुंबांसाठी राष्ट्रीय आरोग्य रक्षण योजना, 50 कोटी रुग्णांना फायदा होणार
  • 24 नवी वैद्यकीय महाविद्यालयं देशभरात उभारणार
  • प्रत्येकी तीन लोकसभा मतदारसंघामागे एक सरकारी वैद्यकीय रुग्णालय उभारणार, देशातल्या 24 जिल्ह्यांमध्ये प्रकल्प राबवणार
  • आरोग्यासाठी १.५ लाख कोटीची तरतूद
  • लाखो कुटुंबांना दवाखान्यातील अॅडमिशनचा खर्च खूप जास्त होतो, त्यासाठी नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम.
  • आयुष्यमान भारत योजना- १० कोटी गरिब कुटुंबासाठी -त्यांना ५ लाख रुपयांची दरवर्षी हॉस्पिटलायझेशनसाठी तरतूद
  • 56 हजार कोटींचा निधी अनुसुचित जातींच्या विकासासाठी मंजूर
  • प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर विद्यालयांची स्थापना होणार पंतप्रधान रिसर्च फेलो स्कीम. त्यात १००० विद्यार्थ्यांना रिसर्चची संधी मिळणार
  • बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार. आरोग्य सुधारणा केंद्र उभारण्यासाठी 1200 कोटी
  • देशातील शिक्षणावर 1 लाख कोटी खर्च करणार
  • आदिवासांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी एकलव्य शाळा सुरु होणार
  • दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणार
  • नर्सरी ते 12 वी पर्यंत एकच शैक्षणिक धोरण
  • शिक्षणाचा दर्जा चिंतेची बाब, दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार
  • 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न,
  • आतापर्यंत 51 लाख घरं बांधली,
  • येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार त्यापैकी 36 लाख घरं शहरात बांधणार
  • ग्रामीण भागात घरं आणि पायाभूत सुविधांसाठी १४.३४ लाख कोटींची तरतूद
  • देशातील 8 कोटी महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन
  • सौभाग्य योजनेतून 4 कोटी गरीब घरांना वीज कनेक्शन देणार
  • स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून 6 कोटी शौचालयांची निर्मिती
  • येत्या वर्षात आणखी 2 कोटी शौचालय बांधण्याचं लक्ष्य
  • 10 हजार कोटी मत्सउद्योग आणि पशुधन विकासासाठी खर्च करणार
  • मत्स्यपालन, शेतीतील पायाभूत सुविधा आणि पशुपालनासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद
  • टॉमेटो आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात होणारं उत्पादन हे सरकार समोरचं मोठं आव्हान
  • अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना, 1400 कोटी रुपयांची तरतूद
  • मनरेगा आणि इतर योजनांतर्गत पायाभूत सुविधा वाढवण्यावर सरकारचा भर
  • किसान क्रेडिट कार्ड आता पशूपालन करणाऱ्यांनाही मिळणार
  • आज देशातलं कृषी उत्पादन रेकॉर्डब्रेक आहे, 3 लाख कोटी फळांचं यंदा उत्पादन झालं आहे
  • 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद
  • यावर्षी 27.5 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन घेण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे
  • 470 बाजार समित्या eNAM नेटवर्कने जोडल्या, उर्वरित मार्च 2018 पर्यंत जोडल्या जातील
  • धान्य उत्पादनात वाढ होऊन 217.50 टन झालं आहे. शेतकरी, गरीबांचं उत्पन्न वाढलं आहे. फळ उत्पादन 30 टन झालं.
  • शेतकऱ्यांच्या मालाला संपूर्ण हमीभाव देण्याचा प्रयत्न, आगामी खरीप हमीभाव उत्पादन खर्चाच्या दीडपट केल्याचा दावा
  • खरीप हंगामापासून हमीभावात दीडपट वाढ करण्याचा निर्णय
  • 2022मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं मोदी सरकारचं लक्ष्य आहे
  • शेतकऱ्यांना दीडपट भाव देण्यासाठी सरकारचे प्रयत्न
  • डिजिटलायझेशनला वेग, कागदपत्र आता ऑनलाईन उपलब्ध होतात : अरुण जेटली
  • गाव-खेड्यांचा विकास आमचं ध्येय
  • भारत लवकरच जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनणार
  • जीएसटी आणखी सोपी करण्याची प्रकिया सुरु
  • गरिबी दूर करुन यंदाच्या बजेटमधून सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न
  • यावर्षीचा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला समर्पित
  • मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली
  • सध्याचा टॅक्स स्लॅब
  • उत्पन्न – टॅक्स रेट
  • 0 ते अडीच लाख – शून्य
  • 2.5 लाख ते पाच लाख – 10 टक्के ( तीन हजारांची अतिरिक्त सूट )
  • 5 लाख ते दहा लाख – 20 टक्के
  • दहा लाखांपेक्षा जास्त – 30 टक्के