नवी दिल्ली: दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ केली असून मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. १ जुलैपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे ५० लाख वेतनधारक कर्मचारी आणि ६२ पेन्शनधारकाना लाभ होणार आहे. यामुळे १६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार असून, चालू आर्थिक वर्षाच्या १ जुलैपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे जावडेकर म्हणाले.