नवी दिल्ली: अयोध्या राम मंदिर प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करणार असेल तर त्यांना थांबवण्यात येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सुनावणी सुरु असताना त्याचवेळी मध्यस्थता करण्याचे प्रयत्न सुरु ठेवण्यास काही हरकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सागितले आहे. यासोबतच सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी अंतिम मुदत दिली आहे. रंजन गोगोई यांनी १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले आहे. अयोध्या प्रकरणातील निकाल नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने गरज पडल्यास एक तास अतिरिक्त तसेच शनिवारीही सुनावणी करण्याची तयारी दर्शवली आहे.