गटनेते जीवन चौधरी यांची पत्रकार परीषदेत माहिती
चोपडा- चोपडा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा जीवन चौधरी व गटनेते जीवन चौधरी तसेच रमेश एकनाथ चौधरी यांच्याविरुद्ध मंगलाबाई संजय भिल यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यासंदर्भात उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अॅड. विनोद पाटील व अॅड. निर्मल देशमुख यांनी या गुन्ह्यासंदर्भात आपली भूमिका म्हणून न्यायालयात बाजू मांडल्याने हा गुन्हा थेट खारिज करण्यात आल्याची माहिती पालीकेचे गटनेते जीवन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चोपडा पालिकेचे गटनेते जीवन चौधरी यांनी पत्रकार परीषदेत बोलतांना पुढे सांगितले की, अॅट्रॉसिटी दाखल करणार्या मंगलाबाई भिल्ल यांना हाताशी धरून लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, रमेश चौधरी यांचे विरुद्ध १३ सप्टेंबर २०१८ रोजी खोटी केस दाखल केली होती. हे प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयात सिद्ध झाल्याने आमचे विरुद्ध ती केस खारीज केली आहे. आम्ही शहराच्या जनतेवर विश्वास ठेवून चोपडा तालुक्याची ही राजकीय संस्कृती नसल्याने अश्या खोट्या केसेस करू नये व त्या करणार्यांच्या पाठीशी जनतेने देखील राहू नये असेही जीवन चौधरी यांनी सांगितले. आपल्याकडून उच्च न्यायालयाचा निकाल लागला असला तरी आपण कोणत्याही प्रकारची मानहानीची केस दाखल करणार नाही. आम्ही संपूर्ण शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक व गटनेते कटिबद्ध राहू असेही जीवन चौधरी यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष मनीषा चौधरी,उपनगराध्यक्ष हुसेन पठाण,नगरसेवक हितेंद्र देशमुख,अशोक बाविस्कर,रमेश शिंदे,नारायण बोरोले,सीमा श्रावगी,सुरेखा माळी, डॉ नरेंद्र शिरसाठ,चेतन चौधरी,कांतीलाल सनेर,वसंत पवार,नोमान काझी,अकिल जहागीरदार, देवा पारधी,आदी हजर होते