मुंबई: राज्यातील सत्ता संघर्ष शिंगेला पोहोचला आहे. सत्ता स्थापनेचा तिढा आज शेवटच्या दिवसपर्यंत सुटलेला नाही. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आज मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याचे बोलले जात होते अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.