दीपस्तंभच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; दिव्यांग रिक्षा चालक झाला अधिकारी

|जळगाव प्रतिनिधी ।

आयबीपीएस आणि एसबीआय परीक्षांच्या माध्यमातून दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रकल्पाचे १९ विद्यार्थी बँक प्रोबेशनरी अधिकारीपदी तर अन्य पाच विद्यार्थ्यांची सैन्य, पोलीस आणि भारतीय रेल्वेत निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, दिल्ली, बिहार असे ६ राज्यातील विद्यार्थी आहेत. यात बँक प्रोबेशनरी अधिकारीपदी प्रशांत केदारे, नांजा पावरा, सचिन कोलकर, दीपक गजरे, अमोल आव्हाड, हिना मुजावर, वैष्णव गित्ते, महादेव सागर, वामीका शर्मा, मोहिनी शर्मा, अवी गुप्ता, वृषभ कामडी, विशाल प्रीतमणी, प्रतिष्ठा गोगिया, मुकेशकुमार परमार, अंकुर सिंह, सौरभ बंसल, आकाश चव्हाण, आदर्श हेब्बाळकर यांची निवड झाली आहे, तर नेहरू झारखंडे याची सैन्यात, सुरेखा अवथळे पोलीस पदी तर साईनाथ शिंदे, विनायक मगदूम आणि भास्कर पांढरे याची भारतीय रेल्वेत निवड झाले आहे.

सुरवातीच्या काळात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारा ज्वार्डी, मालेगाव येथील दिव्यांग प्रशांत केदारे गेल्या ५ वर्षापासून मनोबल प्रकल्पात स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. प्रज्ञाचक्षू नांजा पावरा मध्य प्रदेशातील निवाली गावाचा रहिवासी असून तो ५ वर्षांपासून प्रकल्पात प्रशिक्षण घेत होता. आई- वडील शेत मजुरी करतात. प्रज्ञाचक्षू सचिन कोलकर (औरंगाबाद), दीपक गाजरे ( भंडीशेगाव, सोलापूर), अमोल आव्हाड (गावठाण, अहमदनगर) हिना मुजावर (शिरूर), वैष्णव गित्ते (छत्रपती संभाजी नगर), महादेव

 

शर्मा (पठाणकोट, पंजाब), मोहिनी शर्मा (दिल्ली), अवी गुप्ता (इंदोर, मध्य प्रदेश), वृषभ कामडी (नागपूर), विशाल प्रीतमणी ( अहमदाबाद, गुजरात), प्रतिष्ठा गोगिया (दिल्ली), मुकेशकुमार परमार (शिरपूर, गुजरात), अंकुरसिंह (भोसरी, पुणे), आकाश चव्हाण (नाशिक), आदर्श हेब्बाळकर (कुदनूर, कोल्हापूर), सौरभ बंसल (झंझरतूर, बिहार) तर अमरावती जिल्ह्यातील बामादेही गावातील दिव्यांग नेहरू झारखंडे ६ वर्षांपासून प्रकल्पात होता. त्याचे आई-वडील हातमजुरी करतात. सुरेखा अवथळे (भिवापूर, वर्धा), अल्पदृष्टी साईनाथ शिंदे ( लाडका नांदेड), भास्कर पांढरे ( भीमपुरी, नांदेड) असे यशस्वी विद्यार्थी आहेत. प्रज्ञाचक्षू, दिव्यांग व वंचित विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी व भविष्यासाठी अत्यंत दिशादर्शक आहे. दीपस्तंभ मनोबलच्या माध्यमातून गेली काही वर्ष जे प्रभोधन, प्रेरणा व मार्गदर्शनाची यंत्रणा उभारली गेली. त्यातून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाला हे फळ आलेले आहे. या प्रकल्पात मार्गदर्शन करणाऱ्या तसेच हितचिंतक व देणगीदारांचे दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेद्र महाजन यांनी आभार मानले आहेत.