विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेमार्फत दान परमिता’

जळगाव प्रतिनिधी ।

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेमार्फत बौध्द पौर्णिमेनिमित्त दान परमिता’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानस्रोत केंद्राचे माजी संचालक डॉ. अनिल चिकाटे उपस्थित होते. प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु. पगारे यांनी ‘अभिधम्म चर्चा व चिंतन या विषयावर विचार मांडले. बौध्द धम्मात दानाला महत्व असल्याने डॉ. म. सु. पगारे लिखित ग्रंथ यावेळी विविध विभागांना देण्यात आले. डॉ. पगारे म्हणाले की,कुठल्याही मोहाची अपेक्षा न ठेवता आपण जे ज्ञानदान करतो ते मनाला समाधान देणारे असते. अभिधम्मपिटकामध्ये चित्त, निव्वाण, चेतसिका व शिल यांना महत्व आहे. यावेळी प्रा. जे. बी. नाईक, डॉ. अजय पाटील, प्रा. आशुतोष पाटील, मनोज पाटील, डॉ. यशोदिप पाटील, डॉ. दिपक खरात, डॉ. सुदर्शन भवरे, उज्ज्वला लांडगे, बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ. अभय मनसरे, राजू सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पारधे तर बौद अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी प्रमुख डॉ. संतोष खिराडे यांनी आभार मानले.