शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका; पंतप्रधान मोदी

0

नवी दिल्ली: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मधून देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पंतप्रधानांनी दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका असा बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला. तसेच ‘आजकाल केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. विशेष म्हणजे जगातील देशात दिवाळी महोत्सवात केवळ भारतीयच सहभाग घेत नसून तेथील सरकारे आणि स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात भाग घेत आहेत असेही ते म्हणाले.

सध्या जगभरात फेस्टीव्हल टुरिझमचेही आकर्षण वाढत आहे. आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. आपल्या देशात फेस्टिव्हल टुरिझमचा विकास करण्यास मोठा वाव आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी फेस्टिव्हल टुरिझमकडे सर्वांचे लक्ष वेधले. भारत देशातील साजरे होणाऱ्या सर्व सणांचा प्रसार करायला हवा. इतकेच नाही, तर आपल्या या आनंदात इतर राज्ये आणि देशांनाही सहभागी करून घ्यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

या दिवाळीला काहीतरी वेगळे करणार असे गेल्या वर्षी ‘मन की बात’मध्ये मी संकल्प केला होता. दिवाळीनिमित्त देशातील नारी शक्ती आणि त्यांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करू या, अर्थात लक्ष्मींचा सन्मान करू असा संकल्प मी केला होता, याचीही आठवण पंतप्रधान मोदी यांनी ‘मनकी बात’मध्ये केली.