फैजपूर प्रतिनिधी
येथील गेल्या चार महिन्यापासून मुख्य अधिकारी वैभव लोंढे तसेच पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर विपुल साळुंखे यांची बदली झाल्यामुळे फैजपूर च्या नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या वाऱ्यावर असून गेल्या चार महिन्यापासून शहरात मुबलक पाणी असताना नियोजन शून्य कारभार सुरू असून तसेच साफसफाई वेळेवर होत नसून शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद अवस्थेत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या चार महिन्यापासून येथील मुख्य अधिकारी वैभव लोंढे तसेच पाणीपुरवठा विभागाचे इंजिनीयर विपुल साळुंखे यांनी यशस्वीपणे प्रशासकीय राज मध्ये कोणत्याही नागरिकांना समस्या होणार नाही याची दखल घेत गेल्या दीड वर्षापासून प्रशासकीय कारभार सुरू ठेवला होता परंतु हे दोन्ही जबाबदार अधिकारी यांची बदली होऊन गेल्यामुळे फैजपूर शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे शहरातील नागरिक हे वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे नगर परिषदेत कोणीही अधिकारी जबाबदारी घेत नसल्याने मुख्याधिकारी नाही उद्या येणार परवा येणार असे नागरिकांना उत्तरे दिले जात असल्यामुळे केवळ टाळाटाळीचे उत्तर दिले जात आहे फैजपूर शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली असून गटारी नाले साफसफाई होत नाही आहे शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद पडलेले आहे परंतु असे अनेक कामे नगर पालिकेकडून ठेकेदारांना दिलेले असून कोणतीही सुविधा नागरिकांना मिळत नसल्यामुळे तीर्व संताप व्यक्त केला जात आहे मात्र या ठेकेदारांना नगर पालिकेकडून कामांची बिले मात्र त्वरित कसे दिलेजात आहे असा असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे शहरातील नागरिक वेगवेगळ्या भागातून समस्या घेऊन येत आहे परंतु जे अधिकारी उपलब्ध आहे ते केवळ उडवा- उडवी उत्तरे देऊन नागरिकांना रवाना करण्याचे काम करीत आहे या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखल घेण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे