बंगळूर-कर्नाटक भगवा होणार नाही, हे विविध रंगांचं राज्यच राहिल. खेळ सुरू होण्याआधीच संपला. ५६ इंच विसरा, ५५ तासही कर्नाटक सांभाळता आले नाही. ‘प्रिय नागरिकांनो आता आणखी घाण राजकारण सुरू होईल, तुम्ही तयार रहा’ असे ट्विट करुन प्रकाश राज यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे.
KARNATAKA is not going to be SAFFRON…but will continue to be COLOURFUL….Match over before it began…forget 56 couldn’t hold on for 55 hours..jokes apart…dear CITIZENS now get ready for more muddy politics..will continue to stand for the CITIZENS and CONTINUE #justasking..
— Prakash Raj (@prakashraaj) May 19, 2018
कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही, आणि येथे त्रिशंकु स्थिती राहिली. २२२ जागांपैकी भाजपा १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बीएस येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बहुमत सिद्ध करण्यासाठी १११ आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता.
भाजपा०४ आमदार कडे १होते. बहुमतासाठी बरेच प्रयत्न करुनही सात आमदारांचा पाठिंबा जमवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर येडियुरप्पांनी बहुमत चाचणीलासामोरे जाण्याआधी राजीनामा दिला. काँग्रेसने ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाने ३७ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती केली आहे. त्यामुळे आता कुमारस्वामी हे कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. कुमारस्वामी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांनी ही माहिती दिली.