अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलनाची सांगता
देवपुरातील एकता नगरात पाणी येत नसल्याने महिलांनी पाडले होते रस्त्याचे काम बंद
धुळे l
शातील देवपूर परिसरातीत एकता नगरात गेल्या दिवसांपासून पाणी येत महिलांनी कामबंद आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलन महिलांची सल्याने अर से आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान आंदोलनाची माहिती मिळाल्याने देवपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते त्यानी महिला चर्चा करून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. फेलिसांच्या नस्यस्थीने आंदोलनाची सांगता झाली. आंदोलनात सुशीला सोनार, मिनाबाई पापी पेट शांताबाई परदेशी, लिलाबाई सोमारी, शोभाबाई अहिरे या परिसातील महिला सहभागी झाल्या होत्या.
शहरातील देवपूर परिसरातील पांझरा नदी किनारी असलेल्या एकता नगरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करीत असतांना पिण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व तुटला. त्यामुळे या भागातला पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळालेले नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी हंडे घेत रस्त्यावर आंदोलन सुरू केले. महिला झाल्या आक्रमक रस्त्याच्या कामामुळे पाणी मिळत नाही, त्या रस्त्याचे कामच बंद पाडले. परिणामी रस्त्यावर खडी दाबण्याचे काम करणाऱ्या रोलरचा चालक रोलर थांबवून तेथून निघून गेला. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला राग व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नाही. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क साधला तरी कोणीही समस्या ऐकत नाही. त्यामुळे आम्हाला पाणी द्यावे, मगच रस्त्याचे काम करावे, असे म्हणत महिला आक्रमक झाल्या होत्या.