पुणे-पुण्यात आंबा महोत्सवातील आंब्याच्या स्टॉल्सना आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. अनेक स्टॉल्स आगीत भस्म झाले आहे. पणन मंडळातील आवारात हा आंबा महोत्सव सुरु आहे. गेले 3 आठवडे महोत्सव सुरु होता. पणन मंडळाकडून दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. शेतकरी ते ग्राहक असं त्याचे स्वरुप असते. आंब्याचे ६१ स्टॉल्स जळून खाक प्रत्येक स्टॉल्समध्ये किमान ७०-८० पेट्या होत्या. प्रत्येक स्टॉलचे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र अद्याप आगीचे कारण समजु शकले नाहीत. पोलीस प्रशासन तपास करीत आहेत. आंब्याचे ६१ स्टॉल्सना जळून खाक झाले आहे. प्रत्येक स्टॉल्समध्ये किमान ७०-८० पेट्या होत्या.