| धुळे प्रतिनिधी। जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीत दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. वाढदिवसानिमित्त वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्त्या या कारखान्यामध्ये बनविल्या जात होत्या. या दरम्यान मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागली. या आगीत होरपळून चार महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
” मवत मजूर हे जैताने येथील राहणारे असल्याचे समजते. मयतांमध्ये आशाबाई भैया भागवत (वय ३५) आणि राजश्री भैया भागवत ( वय १५), नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत या चौघींचा समावेश आहे. चौकशीतच आगीच नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल आहे. उर्वरित जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या मयत महिलांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. ही आग नेमकी कशी लागली त्याचा तपास आता पोलीस करत आहेत.