अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या

जन आक्रोश मोर्चा तर्फे जाहीर मागणी

जळगाव – नांदेड़ जिल्ह्यातील बोडार येथील अक्षय भालेराव या तरुणाने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून गावातील काही गुंड लोकांनी त्याची हत्या केली , या घटनेच्या विरोधात जळगाव येथील ‘ अनुसूचित जाति , जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समिति ‘ तर्फे दिनांक २३ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘ जन आक्रोश मोर्चा ‘ काढण्यात आला .
या समिती तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत .
१) अक्षय भालेराव याची हत्या करणाऱ्यांना फाशी ची शिक्षा देण्यात यावी .
२) अक्षय भालेरावच्या हत्येची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी .
३) अक्षय भालेरावच्या कुटुंबातिल सदस्यास शासकीय नौकरी देण्यात यावी .
४) अक्षय भालेरावच्या कुटुंबास ५० लाखाची मदत देण्यात यावी .
५) एट्रोसिटी कायद्याची कड़क अंमलबजावनी करण्यात यावी .
६) महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा .
सदर मोर्चा रेलवे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून नेहरू चौक , चित्रा चौक , शिवाजी महाराज यांचा पुतळा , बस स्टैंड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला .
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यर्पण करण्यात आले . त्या नंतर मोर्च्याचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की , भारतात व महाराष्ट्रात दलित , आदिवासी , अल्पसंख्यक समाजावर मोठ्यप्रमानात अन्याय , अत्याचार होत आहेत .
प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी अत्यंत सविस्तर मांडणी करुण देशात जातीय , धार्मिक दहशत निर्माण करुण जनजीवन बरबाद केले जात असून सरकार संविधान विरोधी वागत आहे . कोणी काय खावे , कसे कपड़े परिधान करावे या वरुन सुद्धा दंगली घडविल्या जातात प्रसंगी लोकांचा जीव घेतला जातो .सरकार या बाबत कठोर निर्णय न घेता गुन्हेगार लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते .यामुळेच भारतात लोकशाही नाममात्र राहिली आहे आणि यातूनच अक्षय भालेराव सारख्या युवकाची हत्या घडून येते असे जयसिंग वाघ यांनी स्पष्ट केले .
या प्रसंगी करीम सालार , फारुख शेख , जगन सोनवणे , राजू सूर्यवंशी यांचीही भाषणे झाली .
जिल्हाधिकारी कार्यालय येथे संयोजक मुकुंद सपकाळे , जगन सोनवणे , राजू सूर्यवंशी , सुमित्र अहिरे यांनी भाषणे केली . सर्वांनी सरकारवर कड़क टिका करुण अक्षय भालेराव ची हत्या करणाऱ्यांना फाशी ची शिक्षा देण्याची व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली .
मोर्च्यात सतीश गायकवाड़ , सुरेश सोनवणे , धुडकु सपकाळे , दिलीप सपकाळे , मिलिंद सोनवणे , राजू मोरे , प्रतिभा शिरसाठ , शारदा
इंगळे, लता बाविस्कर , राजू सवरने , चेतन नंनवरे तसेच शेकडो कार्यकर्ते हजर होते .