मुंबई : ‘द केरळा स्टोरी’ सिनेमावरून चांगलाच वाद सुरू आहे. या चित्रपटातीस दावे खोटे असल्याचा आरोप करत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या चित्रपटाने दोन्ही दिवसांत चांगली कमाई केली आहे. दरम्यान, या सिनेमाच्या वादावरून अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
कंगणा रणौत म्हणाली की, बघा,मी हा चित्रपट पाहिला नाही. पण चित्रपटावर बंदी घालण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मी आजच वाचलं, जर मी चुकीची असेल तर दुरूस्ती करा, पण चित्रपटावर बंदी घालता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे. मला वाटतं की तो चित्रपट ISIS शिवाय कोणालाही वाईट किंवा चुकीचं म्हणत नाही आहे. देशातील सर्वात जबाबदार संस्था उच्च न्यायालय असे म्हणत असेल तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. ISIS ही दहशतवादी संघटना आहे. मी त्यांना दहशतवादी म्हणत आहे, असं नाही, तर आपला देश, गृहमंत्रालय आणि इतर देशांनीही त्यांना तेच म्हटलं आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की ती दहशतवादी संघटना नाही, तर मग तुम्हीही दहशतवादी आहात हे उघड आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एखादी दहशतवादी संघटना दहशतवादी नाही. त्या संघटनेला कायदेशीर, नैतिकदृष्ट्या, सर्व प्रकारे दहशतवादी घोषित करण्यात आलंय, पण तुम्हाला तसं वाटत नसेल तर ती चित्रपटाची नाही तर तुमची सवय आहे. तुम्ही आधी विचार केला पाहिजे की तुम्ही आयुष्यात कुठे उभे आहात? असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला.
मी अशा लोकांबद्दल बोलत आहे, जे विचार करत आहेत की हा चित्रपट ISIS वर नाही तर त्यांच्यावर हल्ला करत आहे. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही दहशतवादी आहात. इतकं साधं हे गणित आहे, असंही कंगना म्हणाली.