बंगळूर-कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांमुळे प्रचारात कमालीची रंगत आली आहे. आज कर्नाटक येथील भालकी येथे झालेल्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी आणि राज्यातील सिद्धरामय्या सरकारवर टीकास्त्र सोडले. देशावर जेव्हा-जेव्हा संकट येते, तेव्हा राहुल गांधी इटलीला पळून जातात, असा टोला त्यांनी लगावला.
भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यास सर्वसामान्य नागरिकांचा लुटलेला पैसा पुन्हा वसूल करून तो जनतेच्या कल्याणार्थ वापरला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर देशाला जेव्हा-जेव्हा एखाद्या संकटाचा सामना करावा लागला. तेव्हा राहुलजी देश सोडून इटलीला पळून गेले, असा आरोप त्यांनी केला. भाजपा सत्तेत आल्यानंतर राज्यात विकासाला प्राधान्य दिले जाईल असे ते म्हणाले. दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांच्यावर गुंडगिरीचे आरोप केले.
Whenever the nation is facing some kind of crisis, Rahul ji runs away to Italy: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in Bhalki #KarnatakaElections2018 pic.twitter.com/yg2Mr6v1jz
— ANI (@ANI) May 7, 2018