नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही तीन कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. कोरोनामुळे भारतातील परिस्थिती गंभीर झाली आहे. जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. दररोज रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. मागील गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत आणखी मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 70,496 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 964 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 69 लाख 6 हजार 152 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे देशात 1 लाख 6 हजार 490 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
India's #COVID19 tally crosses 69-lakh mark with a spike of 70,496 new cases & 964 deaths reported in the last 24 hours.
Total case tally stands at 69,06,152 including 8,93,592 active cases, 59,06,070 cured/discharged/migrated cases & 1,06,490 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/4TlKC5qEZh
— ANI (@ANI) October 9, 2020
मागील २४ तासात म्हणजे गुरुवारी या एकाच दिवशी 11 लाख 68 हजार 705 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 70,496 पॉझिटिव्ह आले. आजपर्यंत देशात 8 कोटी 46 लाख 34 हजार 680 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
11,68,705 samples tested for #COVID19 yesterday. Total 8,46,34,680 samples tested in the country up to 8th October: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/EMH24ys2gv
— ANI (@ANI) October 9, 2020
रुग्ण संख्या वाढत असली तरी दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 59 लाख 6 हजार 70 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनामुक्तांचे प्रमाण 85 टक्क्यांच्या वर गेला आहे. सध्या 8 लाख 93 हजार 592 (12.94 टक्के)रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे. तसेच मृत्यूदरही कमी होत आहे.