भारताला व्यसनाधीनतेचा विळखा पडलाय : जयसिंग वाघ

जळगाव :- आपल्या देशात लहान मुलांपासुन तर वयोवृद्ध लोकांपर्यंत व्यसनाधीनता लागलेली आहे . आज भारतात सुमारे २कोटी लहानमूलं , १६ कोटी तरुण तर ३६ कोटी इतर वयोगटातील लोक वेगवेगळ्या व्यसनांनी ग्रस्त आहेत . या करीता जनप्रबोधन करुन व्यसनमुक्त समाज घडववा व या करीता केवळ पंधारवाडा न पाळता वर्षभर विविध उपक्रम राबवावे असे आवाहन प्रसिद्ध साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .

सामाजिक न्याय विभागातर्फे नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृति पंधारवाडा समाप्ति , आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस व सामाजिक न्याय दिवस निमित्त आय टी आय , जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते .

सामाजिक न्याय दिवस अर्थात राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमात जयसिंग वाघ यांनी शाहू महाराज यांच्या सामाजिक , शैक्षणिक कार्याचा आढावा घेवून ते या देशातील सामाजिक व शैक्षणिक जाण असलेले सम्राट अशोका नंतरचे पहिले राजे होते हे स्पष्ट केले . त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले , जे पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवीणार नाही त्यांना दंड ढोढाविला , फार मोठ्या प्रमाणात वस्तीगृह बांधले , मागास समाजास ५० % आरक्षण लागू केले . शाहू महाराज म्हणजे माणसा मधला राजा व राजां मधला माणूस होय असेही वाघ यांनी स्पष्ट केले .

समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी भारत नशा मुक्त करण्या करीता केंद्र सरकार , राज्य सरकार करीत असलेल्या विविध उपाय योजना तसेच आपली काय कर्तव्ये आहेत याची माहिती देवून विद्यार्थ्यांनी मोठ्यप्रमानात अभ्यास करुन यश संपादन करावे असे आवाहन केले .

प्राचार्य संजय पाटील यांनी अध्यक्ष स्थानावरुन भाषण करतांना व्यसन मुक्त भारत करणे कामी आपण वचनबद्ध होवूया असे आवाहन केले .

विनोद ढगे यांनी ‘ नशा करी दुर्दशा ‘ हे पथनाट्य सादर करुन नशेचे दुष्परिणाम काय काय होतात हे पटवून दिले .त्या नंतर सर्व उपस्थित विद्यार्थी , कर्मचारी , मान्यवर यांना व्यसनमुक्ति ची शपथ दिली .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप उगले यांनी केले . कार्यक्रमास रविंद्र बारी , राजेंद्र पाटील , प्रमोद मोरे , लोकेश धांडे , नितिन चौधरी , विनायक बाविस्कर , दीपक महाजन तसेच इतर अधिकारी व कर्मचारी तसेच ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी हजर होते .

कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सचिन महाजन , दुर्गेश अंबेकर , संतोष चौधरी , अरविंद पाटील , अवधूत दलाल यांनी परिश्रम घेतले , कार्यक्रमाच्या अखेरिस जनजागृती यात्रा काढण्यात आली . या यात्रेस सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली .