वादळ, बारा, अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी मदत मिळवून देण्याचे आश्वासन
जळगाव प्रतिनिधी ।
“जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात अकाळी पावसामुळे शेतपिकांबरोबरच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावे. शासन नियमानुसार नुकसान्तस्तांना वारसी जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून जळगाव तालुक्यातील गावांमध्ये होत असलेल्या दीपिकाबरोबरच इतर पिकांचे घरांचे तसेच विद्युत पोल तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी. नुकसानग्रस्त शेतकयांना शासनाच्यावतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी प्रयत्नशील असून शेतकयांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळवून दिली जाईल.
जळगाव तालुक्यातील नशिराबादी निमगाव, उमाळे, देव्हारी, चिंचोली परिसरात वादळी पाऊस व वान्याने दिलेल्या जोरदार तडाख्यात मोठ्या प्रमाणात कळी, लिंबू, पपई आदि पिकांसोबतच झाडे उन्मळून पडल्यामुळे नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकाळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानीसंदर्भात शेतकरी ग्रामस्थ यांचेशी चर्चा करून त्यांना धीर दिला. परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसिलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जिल्हा कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, महावितरणचे आवटे विस्तार अधिकारी पी. श्री. अहिरे, स्थानिक लोकप्रतिनिधींसह संबंधित गावांचे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.
तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश
यावेळी त्यानी तत्काळ पनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. बरोबर ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना निवासाची व्यवस्था करण्याचीही सुचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. निमगांव व नशिराबाद येथे वाद दायामुळे विद्युत पोल तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा, तसेच विद्युत पुरवठा सुरळीत आवश्यकता मासल्यास गावकऱ्यांना पिपाणी उपलब्ध करून देणासाठी टैंकर पिण्याच्या पायाच्या पुरवठा करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री पाटील त्यांनी चिंचोली परिसरात कंटेनर पलटी होऊन मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणी भेट दिली. तसेच या ठिकाणी असलेल्या बिहार येथील कामगारांची भेट घेऊन त्यांना तात्पुरता निवारा व जेवणाची व्यवस्था याला सांगितले.
” यावेळी जिल्हाधिकारी मित्तल यानी सागितले की, ज्या नागरिकांच् घरांचे नुकसान झाले आहे. त्याचा असून ज्यांच्या घरां तयांची नावे घरकुलांच्या ” यादीत असल्यास त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर केले जाईल तसेच महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे. लवकर पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर केला जाईल, असेही सांगितले.