नवी दिल्ली-पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधींचा चुना लावून भारतातून पलायन केलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणणे अवघड झाले आहे. कारण, अँटिग्वा सरकारने चोक्सीला भारतात पाठवण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही माध्यमांतील वृत्तांतून मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी भारताकडून बोईंग विमान पाठवण्यात आले आहे असा दावा करण्यात आले होते. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर अँटिग्वा सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.
मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता हे दोघेही अनुक्रमे अँटिग्वा आणि किट्स या देशांमध्ये शरण गेले आहेत. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी कॅरेबिअन बेटांवर जाणार होते. त्यासाठी भारताचे हे अधिकारी एक बोईंग विमान घेऊन जाणार होते असे वृत्त होते.