बंगळुरू l
कसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बघितल्या जाणाऱ्या या निवडणुकीत विजय मिळाल्याने काँग्रेस कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. कर्नाटकमधील मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान केल्याने आता पक्षाला स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करता येणार आहे. – पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील महत्त्वाच्या राज्यात झालेला हा पराभव भाजपसाठी धक्का मानला जात आहे. सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास जाहीर झालेले निकाल आणि मतमोजणीतील आघाडीनुसार, काँग्रेसच्या पारड्यात १३६ जागा जाताना दिसत आहे. तर, भाजपला ६४ जागांवर विजय मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये किंगमेकर राहण्याची शक्यता वर्तवलेला जनता दल सेक्युलरने २० जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुकीतील या विजयानंतर देशभरात कॉंग्रेसने जल्लोष साजरा केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल भारतीय जनता पक्षासाठी एका मोठ्या झटक्यापेक्षा कमी नसल्याचे है म्हटले जात आहे. मावळत्या सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारमधील अनेक मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. बी श्रीरामुलू, सुधाकर, जेसी मधुस्वामी, गोविंद करजोल एमटीबी नागराज जैसी नारायण गौडा आणि विधानसभा अध्यक्ष व्ही. हेगडे यांच्या नावांचा समावेश आहे. बसवराज बोम्मई यांनी शिगाव आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येदियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र हे शिकारीपुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी भाजप नेते आणि मंत्री और अशोक यांचा १ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. दुसरीकडे, चित्तापूर मतदारसंघातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक यांनी भाजपच्या मणिकांत राठोड यांचा १३,००० हुन अधिक मतांनी पराभव केला. माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना मोठा धक्का बसला आहे. रामनगरममध्ये एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल यांचा काँग्रेसचे उमेदवार एचए इक्बाल हुसैन यांच्याकडून १० हजार ७१५ मतांनी पराभव झाला आहे.
बेळगावमध्ये काँग्रेसची मुसंडी
बेळगावला कर्नाटकच्या उपराजधानीचा दर्जा आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये १८ विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यामध्ये तब्बल १५ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे, तर सात जागांवर भाजपला समाधान मानावे लागले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे कॉंग्रेसने तब्बल अकरा जागा जिंकत आपलं केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारातील मुद्यांवरून चांगलीच गाजली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याशिवाय, बजरंग दल आणि पीएफआयवरील बंदीचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. त्या मुद्यावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी याला हिंदुत्ववादाशी जोडले आणि हनुमानाचा अपमान असल्याचे प्रचारात म्हटले.. तर, कॉंग्रेसने स्थानिक मुद्यावर भर दिला होता..
सीमा भागात काँग्रेसचा बोलबाला, महाराष्ट्रासाठी सूचक इशारा !
या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक हाती घेत राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणत कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले होते.
देशातील आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्याने दक्षिण भारतामध्ये प्रवेशद्वार आणखी प्रबळ करण्यासाठी भाजपकडून कर्नाटकमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक हाती घेत राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणत कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र, काँग्रेसने ही निवडणूक पूर्णतः स्थानिक मुद्यांवरून आणि गेल्या पाच ही निवडणूक जिंकली.
या निवडणुकीमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक यश मिळवताना तब्बल १३० हून अधिक जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जनता दल सेक्युलरची मदत काँग्रेसला घ्यावी लागेल असं बोललं जात होतं… मात्र, या सर्व चर्चांना काँग्रेसने पूर्णविराम देत सत्ता मिळवलेली आहे. कर्नाटकी जनतेने ज्या पद्धतीने निकाल दिला आहे तो पाहता भाजप नेतृत्वाला एक प्रकारे २०२४ साठी सूचक इशारा तर दिला ना? असा सवाल उपस्थित झाला आहे. कर्नाटक राज्यासह महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमा भागामध्ये काँग्रेसला मिळालेले यश हे निश्चितच आत्मविश्वास देणारे आहे.
पंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे कौतुक
नवी दिल्ली। कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचं कौतुक केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा! असं ट्रीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या. कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी भाजप पक्षाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो, असेही ते म्हणाले. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो, असं मोदी म्हणाले.
मोदी है तो मुमकिन है लोकांना अमान्य
‘मोदी है तो मुमकिन हैं’ याला लोकांनी नाकारल्याचं शरद पवार म्हणाले मोदी है तो मुमकिन है असं याआधीच बोलायला भाजपाच्या लोकांनी सुरुवात केली होती. कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला धुळ चारली आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कर्नाटकच्या जनतेनं कायम ठेवत यावेळी काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलाय. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या जनतेचं आणि काँग्रेसचं अभिनंदन केलं. तसंच महाराष्ट्रातील लोकांनाही आता बदल हवा असल्याचं ते म्हणाले.