MPSC : निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे पुण्यात चक्काजाम आंदोलन

पुणे : MPSC परिक्षेत उतीर्ण होऊनही निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या अद्याप नेमणुका झालेल्या नाही. सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या कचट्यात अडकलेल्या नियुक्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचू लागले आहे. पुण्यातील अहिल्या अभ्यासिकासमोर अधिकारी म्हणून निवड झालेले उमेदवारांनी चक्काजाम आंदोलन सुरु केले आहेत.

राज्य सेवा आयोगाच्या परिक्षाचा १९ जून २०२० रोजी निकाल लागल्यानंतर ४१३ उमेदवारांची निवड झालेली आहे. त्यानंतर २ महिन्यांत या नियुक्त्या होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने त्या न केल्याने ९ सप्टेंबर २०२० च्या मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात या नियुक्त्या सापडल्या. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर इतर नियुक्त्या देण्याचा उल्लेख केला. त्यानंतर २ महिने उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारने त्यावर अद्याप निर्णय घेतला नाही. हे सर्व गट – अ पदी निवड झालेले अधिकारी आहेत. त्यामुळे सरकाच्या वेळकाढू धोरणाला कंटाळून हे अधिकारी आता रस्त्यावर उतरले आहेत.