दिलासादायक: रुग्ण वाढीचा वेग मंदावला; रिकव्हरीही वाढली

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. भारतातही कोरोनाने कहर केला आहे. दररोज ८५ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. त्यातच भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ६६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतातील कोरोना बळीच्या संख्येने देखील एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

मात्र मागील दोन दिवसांपासून काहीशी दिलासादायक परिस्थिती आहे. ८५ हजारापेक्षा अधिक आढळून येणारी रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांपासून कमी झाली आहे. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस रुग्णसंख्या ७५ हजारापेक्षा कमी आढळून आली आहे. शनिवारी एका दिवसांत ७५ हजार ८२९ नवीन रुग्ण आढळून आले होते तर ८२ हजार २६० रुग्ण बरे झाले होते.

भारतातील रुग्ण संख्येने ६६ लाखांचा टप्पा ओलांडली आहे. आतापर्यंत ६६ लाख २६ हजार ८३५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ५५ लाख ८६ हजार ७०३ रुग्णांनी कोरोनाव्र मात केली आहे. तर दुर्दैवाने आतापर्यंत १ लाख दोन हजार ६८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९ लाख ३४ हजार ४२७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. भारतातील रिकव्हरी रेत ८४.३४ वर पोहोचला आहे. सध्या १४.११ टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहे. मृत्यू दर १.५५ टक्के आहे.