मुंबई: २०१९ च्या लोकसभेचा निकाल लागला असुन, पुन्हा एकदा देशातील जनतेने मोदींवर विश्वास दाखवाला आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाट होती, २०१९च्या निवडणुकीत सुनामी आहे असेही ते म्हणाले. हा निकाल पाहून आमची जबाबदारी वाढली आहे असे ते या वेळी म्हणाले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तरी जनतेने आमच्या सरकारच्या कामांवर विश्वास ठेवत जनतेने आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिले आहे. हा कौल पाहताना आम्हाला पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करणार आहोत. आमच्या सहकारी पक्षां बरोबर जनतेचे आभार त्यांनी व्यक्त केले.
या निवडणुकीत महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी विजयासाठी प्रयत्न केले, तसेच रामदास आठवले यांचे उमेदवार नसताना त्यांनी सभा घेतल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत नमूद केले.