पालिकेच्या उद्यान विभागाचे उड्डाणपुलावर ठेवलेल्या कुंड्यांकडे दुर्लक्ष..

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिकेचा उद्यान विभाग उड्डाणपुलावर ठेवलेल्या कुंड्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका आपचे पदाधिकारी यल्लाप्पा वालदोर यांनी केली आहे.

फुगेवाडी-दापोडी येथील उड्डाणपूलावर काही झाडे लावली होती. मात्र, आज रखरखत्या उन्हात ही सर्व झाडे वाळून जात आहेत. उद्यान विभागाचे याकडे लक्ष देत नाही.  झाडांना वेळेवर पाणी दिले जात नाही. वेळेवर खत घातले जात नाही, कुंड्यामधील कचरा साफ केला जात नाही. उद्यान विभाग जर ही झाडे जगवू शकत नाहीत, झाडांची निगा राखू शकत नाहीत, औषध फवारणी करू शकत नाही तर जनतेचा कररुपी पैसा वायफट का घालावत आहे, असा सवाल आपचे यल्लाप्पा वालदोर यांनी केला आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना या संदर्भात निवेदन त्यांनी दिले असून घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व झाडांची योग्य ती निगा राखावी, अशी मागणी यल्लाप्पा वालदोर यांनी केली आहे. यावेळी ब्रम्हानंद जाधव, कमलेश रणावरे व सचिन पवार हे कार्यकर्ते सोबत होते.