नवी दिल्ली : दिल्ली नागरिक सध्या प्रदूषणामुळे हैराण झाले आहेत. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. दरम्यान भारतीय संघाचा क्रिकेटपटू गौतम गंभीरने या समस्येवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले. गंभीरने ”केजरीवाल यांनी खोटी आश्वासने दिली. ते प्रदूषण व डेंग्युची समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. केजरीवाल यांच्यामुळे या पिढीला प्रदूषणात रहावे लागत आहे.”
“दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्ली में जगाया AAP ने, पहले तो यहाँ Oxygen था, Oxygen भगाया AAP ने।” @ArvindKejriwal @AamAadmiParty our generations are going up in smoke like your false promises. U had 1 full year to tame dengue &pollution, sadly you couldn’t control either. Wake up!!! pic.twitter.com/xePi5mubO5
— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 31, 2018
गंभीरने दिल्ली सरकारवर निशाणा साधताना बुधवारी एक ट्विट केले. ”दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्ली में जगाया ‘आप’ने, पहले तो यहां ऑक्सिजन था, ऑक्सिजन भगाया ‘आप’ने., असे ट्विट गंभीरने केले आहे. गंभीरने या पोस्टमध्ये जामा मशीद परिसरातील एक फोटोही टाकला आहे.