दिल्ली-खाजगी कंपनी किंवा संस्थेमार्फत शासकीय पदभरतीची परीक्षा घेतली जातात. मात्र खाजगी केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांची निवड होत नाही. त्यामुळे कर्मचारी निवड आयोग (एसएससी) उमेदवारांनी खाजगी संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात येऊ नये अशी मागणी परदेशी आणि प्रशिक्षण विभागाला (डीओपीटी) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच अनेक चौकशी प्रलंबित असून त्या लवकर करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याचिकाकर्त्यांच्या वतीने डिपीटीचे सचिव यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असेही नमूद केले आहे की सिफी आणि खाजगी परीक्षा केंद्रांच्या सेवांचा उपयोग करून आणखी कोणतीही परीक्षा घेतली जाऊ नये अशी मागणी केली आहे. खाजगी कंपनी सिफी टेक्नॉलॉजीज एसएससीच्या वतीने परीक्षांचे आयोजन करत आहे ज्यात विविध गैरप्रकार सापडले आहेत. यावर एसएससी अध्यक्ष यांनी सिफर टेक्नॉलॉजीजने म्हणून घेतलेल्या परीक्षांदरम्यान विविध गैरप्रकार घडले आहेत आणि आता सी.एल.ई.एल. टियर 2 अशा एका परीक्षेत सी.बी.आय चौकशी सुरु असल्याचे सांगितले आहे.