सोनभद्र हत्याकांडातील पिडीतांना भेटायला गेलेल्या प्रियांका गांधींना अटक

0

सोनभद्र: उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी कुटुंबियांची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. तब्बल ९ जणांची हत्या झाली आहे. संपूर्ण देशभरात या प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान आज या घटनेतील पिडीत कुटुंबियांची काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना पिडीत कुटुंबियांना भेटू दिले नाही. त्यांना अटक करण्यात आली आहे. मी फक्त पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले होते, मात्र आम्हाला भेट घेऊ दिली नाही म्हणत, आमचा लढा सुरूच राहील असे त्या म्हणाल्या.

दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत २९ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. घटनेची चौकशी सुरु असून गुन्हेगारांना शिक्षा होईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.