राहुल गांधी संतापले

0

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर आणि पक्षाचे प्रवक्ते रवींदर शर्मा यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच दोन्ही नेत्यांना जम्मू पोलिसांनी अटक केली.अटकेची माहिती काँग्रेसने ट्टिटवरुन दिली.पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी चांगलेच संतापले.काँग्रेसच्या नेत्यांना अटक केल्यामुळे संताप व्यक्त करत हा वेळेपणा कधी थांबणार असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला.एका रा÷ष्ट्रीय पक्षाविरोधात केलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीवर आणखी एक हल्ला केला आहे.हा वेळेपणा कधी थांबणार आहे? असा संतप्त सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला.दरम्यान, काश्मीरीतील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना झालेल्या कारवाईमुळे राहुल गांधी चांगलेच भडकले.