नवी दिल्ली – काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी आज मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करणार आहेत. थोड्याच वेळात ते पिपली मंडी येथे पोहोचतील. गेल्या वर्षी याच दिवशी शेतकरी आंदोलनात ६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना नमन करण्याच्या उद्देशाने राहुल यांच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमल नाथ, दीपक बावरिया, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, जोतिरादित्य सिंधिया, विवेक तनखा, माजी काँग्रेस अध्यक्ष सुरेश पचौरी, अरुण यादव, विरोधी पक्षनेते अजय सिंह आदी उपस्थित राहतील. नुकतेच राहुल यांनी ट्विट करून म्हटले होते, की ते ६ जूनला मंदसौर येथे एका रॅलीला संबोधित करताना देशातील कृषी विषयावर बोलतील.
हमारे देश में हर रोज़ 35 किसान आत्महत्या करते हैं। कृषि क्षेत्र पर छाए संकट की तरफ़ केंद्र सरकार का ध्यान ले जाने के लिए किसान भाई 10 दिनों का आंदोलन करने पर मजबूर हैं। हमारे अन्नदाताओं की हक की लड़ाई में उनके साथ खड़े होने के लिए 6 जून को मंदसौर में किसान रैली को संबोधित करूंगा। pic.twitter.com/Bv4Hv72jE8
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 2, 2018