नवी दिल्ली-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या कैलास मानसरोवर यात्रेत आहेत. यावेळी राहुल गांधींनी आपल्यालाला आलेली अध्यात्मिक अनुभूती फोटोसह शेअर केली आहे. एखादा व्यक्ती कैलासला तेव्हाच जाते जेव्हा त्याला तेथून निमंत्रण आलेले असते. मला ही संधी मिळाल्याने आणि या सुंदर यात्रेचा अनुभव घेण्यास मिळाल्याबद्दल मी खूपच खूष आहे असे राहुल यांनी म्हटले सांगितले आहे.
The waters of lake Mansarovar are so gentle, tranquil and calm. They give everything and lose nothing. Anyone can drink from them. There is no hatred here. This is why we worship these waters in India.#KailashYatra pic.twitter.com/x6sDEY5mjX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 5, 2018
राहुल गांधींने लिहीले की, मानसरोवराचे पाणी खूपच शांत, स्थिर आणि कोमल आहे. हे सरोवर आपल्याला सर्वकाही देते मात्र, त्याबदल्यात आपल्याकडून काहीच घेत नाही. या सरोवराचे पाणी कोणीही ग्रहण करु शकतो. इथे कुठलाही द्वेष नाही. त्यामुळेच भारतात या पाण्याला पुजले जाते. या यात्रेत मी जे काही पाहिले ते शेअर करत आहे.
A man goes to Kailash when it calls him. I am so happy to have this opportunity and to be able to share what I see on this beautiful journey with all of you.#KailashYatra
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 5, 2018
राहुल यांच्या कैलास मानसरोवरच्या यात्रेवरुन सध्या भाजपा आणि काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. भाजपाने राहुल गांधींच्या या यात्रेला ढोंगीपण म्हटले आहे. तर भाजपाची ही टिपण्णी म्हणजे एक भिवभक्त आणि त्याच्या भक्तीमध्ये विघ्न असल्याचे संबोधले आहे. त्याचबरोबर या यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी मांसाहार केल्याचा आरोप भाजपाने केला होता. मात्र, त्यानंतर काही वेळातच काठमांडू येथील हॉटेलने यावर स्पष्टीकरण देत राहुल गांधींनी येथे केवळ शाकाहारी जेवणच मागवल्याचे सांगितले.