मुंबई : बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची निवड ज्या क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्यांनी केली, त्यांना नोटीस पाठविली आहे. परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी सदस्यांना नोटीस पाठवली आहे. जर या नोटीशीला या सदस्यांना योग्य ते उत्तर देता आले नाही, तर शास्त्री यांची निवड रद्द होऊ शकते. रवी शास्त्री यांचे पद रद्द झाल्यास भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसणार आहे.
क्रिकेट सल्लागार समितीमधील कपिल देव, अंशुमन गायकवाड, शांता रंगास्वामी यांना बीसीसीआयने परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर त्यांना या नोटीशीला उत्तर पाठवण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. बीसीसीआयकडून नोटीस मिळाल्यावर रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. त्यामुळे जर क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्यांना योग्य ते उत्तर बीसीसीआयच्या नोटीशीला देता आले नाही तर शास्त्री यांचे प्रशिक्षकपद रद्द होऊ शकते.
कपिल देव सध्याच्या घडीला समालोचन करत आहेत. बीसीसीआयशी ते समालोचक म्हणून करारबद्ध आहेत. त्याचबरोबर फ्लडलाइट या कंपनीचे ते मालक आहेत. त्याचबरोबर भारतीय क्रिकेपटूंच्या संघटनेचे ते सदस्य आहेत आणि त्याचबरोबर ते सल्लागार समितीचे अध्यक्षही होते. त्याचबरोबर अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी हे दोघेही भारतीय क्रिकेपटूंच्या संघटनेचे ते सदस्य आहेत. त्यामुळे यामध्ये परस्पर हितसंबंध जपले जात असल्याचा आरोप मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केला आहे. त्यानुसार बीसीसीआयने या तिघांनाही नोटीस पाठवली आहे. आता या तिघांनाही या नोटीशीला उत्तर द्यावे लागणार आहे.