मुंबई – राज्यातील 833 मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या 833 परीक्षार्थी आणि भावी मोटार वाहन निरीक्षकांवर अन्याय झाला आहे. दरम्यान राज्य सरकारने 833 मोटार वाहन निरीक्षकांच्या बाजुने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरुन सांगितले आहे.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर MPSC मार्फत निवड होऊनही न्यायालयाच्या निर्णयामुळे अन्याय झालेल्या त्या 833 उमेदवारांच्या प्रश्नी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे या मागणीसाठी आज मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची भेट घेतली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. pic.twitter.com/dgBmg1mbeI
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 13, 2018
निवड रद्द झालेले सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा भोंगळ कारभार या विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारा ठरला आहे.