अबब…एसीबीआयला ४,८७६ कोटींचे नुकसान

0

नवी दिल्ली- भारतीय स्टेट बँकेला तब्बल ४,८७६ कोटींचे मोठे नुकसान झाले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमधील कर्जाच्या दबावामुळे एसबीआयवर ही परिस्थिती आली आहे. मागील आर्थिक वर्षी याच तिमाहीमध्ये एसबीआयला २ हजार ६ कोटींचा फायदा झाला होता.

एसबीआयला झालेल्या तोट्यामुळे बँकेची स्थिर संपत्ती (एनपीए) ९.९७ टक्क्याहून वाढून १०.६९ टक्के झाली आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्याच तिमाहीमध्ये एकूण कर्ज ८ हजार ९२९.४८ कोटीच्या दुप्पट झाले होते. ते वाढून १९ हजार २२८ कोटी रुपयापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे एसबीआयला नुकसान झाले आहे.