नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याला राहुल गांधी यांनी आज ट्विटरमार्फत प्रत्युत्तर दिले. ‘मोदी जी, लढाई संपलेली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे असे ‘ असे ट्विट राहुल यांनी केले आहे. तुमची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही.’
मोदींनी काल प्रतापगड आणि बस्ती येथील जाहीरसभांमध्ये राहुल यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. ‘तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन अशी रंगवली होती. पण त्यांच्या आयुष्याची अखेर ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात झाली. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो, पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही,’ असं मोदी म्हणाले होते. त्यावर राहुल यांनी मोदींचा हा हल्ला परतवून लावत ट्विट केले आहे.