नवी दिल्ली :लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज झालेल्या बऱ्याच चर्चेनंतर बेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा विधेयक २०१९ यूएपीए मंजूर करण्यात आले. या विधेयकाला कॉंगेस पक्षाचा विरोध होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसवर टीका करत इंदिरा गांधी यांनी हे विधेयक आणले होते, असे सांगितले.
अमित शहा यांनी अर्बन नक्षलवादावर हल्लाबोल केला. अर्बन नक्षलवाद वाढवण्यासाठी जे कोणी प्रयत्न करतील. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आमचे सरकार त्यांना कोणतीही सहानुभूती दाखविणार नाही, असेही अमित शहा यांनी सांगितले, तसेच दहशतवादाच्या वाढीसाठी रसद पोहोचविणाऱ्यांना, आर्थिक पाठबळ देणाऱ्यांना, दहशतवादी साहित्याचा प्रचार प्रसार करून तरुणांच्या मनात दहशतवादाची थिअरी रुजवणाऱ्यांना दहशतवादी संबोधायचे की नाही? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.
दहशतवाद्यांवर कठोर कारवाईने नव्हे तर त्यांच्याशी चर्चा करूनच नियंत्रण आणले जाऊ शकते, या विचारांशी कोणीही सहमत नाही. एखाद्याकडे बंदूक असली म्हणजे तो दहशतवादी होत नाही, तर त्याच्या डोक्यात दहशतवादी विचार असतात म्हणूनच तो दहशतवादी बनतो, असेही अमित शहा यांनी लोकसभेत सांगित