संघ, भाजपमुळे हिंदू धर्माचे नुकसान

0

नवी दिल्ली-संघ, भाजपमुळे हिंदू धर्माचे नुकसान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे हिंदू धर्माचे मोठे नुकसान झाले आहे, असे वक्तव्य शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. शकराचार्य स्वरूपानंद यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली आहे.

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना संघ, भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही, हे फार धक्कादायक असल्याचे सांगताना शंकराचार्य म्हणाले.

भाजपचे नेतेच बीफचे निर्यातदार
एका प्रश्नाच्या उत्तरात शंकराचार्य म्हणाले, ‘प्रत्यक्षात भाजपचे नेतेच बीफचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत. असे असतानाही भाजप गोहत्येचा विरोध करते आणि बीफ निर्यात हा भारताला लागलेला डाग असल्याचे सांगते. भाजपने खरोखरच देशाला दिलेली अश्वासने पूर्ण केली काय? खरोखरच हव्या त्या प्रमाणात नागरिकांना रोजगार मिळाला काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील गरीबातील गरीब व्यक्तिला १५ लाख रूपये देण्याचे अश्वासन दिले होते. ते खरेच पूर्ण झाले? आयोध्येत राम मंदिर उभारले? असे एकाहून एक प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केले. तसेच, या प्रश्नाचे उत्तर देण्यात भाजपचे नेते अपयशी ठरत आहेत. याच नेत्यांनी २०१४ मध्ये निवडणूक प्रचार केला होता असेही ते म्हणाले.