मुंबई:राज्यात सत्ता संघर्षात कोणत्याही पक्षाला सरकार बनविता न आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राजवटीची शिफारस केली होती. भाजप-शिवसेनेनंतर तिसरा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीने संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याबाबतच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात आता तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतचा अहवाल गृहमंत्रालयाला दिला होता. राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेबाबत असमर्थ असल्याने वेळ वाढवून मागितली होती. ती राज्यपालांनी नाकारली आणि राजवटीसाठी राष्ट्रपतींकडे शिफारस केली.