नवापूर शहरातील एकाच कुटूंबातील तिघांनी केली रेल्वे रुळावर आत्महत्येने खळबळ

नंदुरबार l प्रतिनिधी 

नवापूर शहरातील तीनटेम्बा परिसरातील एकाच कुटूंबातील तीन व्यक्तीनी रेल्वे खाली आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नवापूर नगर परिषद हद्दीतील तीनटेंबा परिसरातील रहिवासी सावंत सैय्यद गावित यांनी वडिलांकडे नवीन दुचाकीची मागणी केली.

मात्र वडील सैयद कर्मा गावीत यांनी त्यास नकार दिल्याने याचा राग आल्याने सावंत सैय्यद गावित (वय 21) व त्याची पत्नी रोशनी सावत गावित या दोघांनी काल रात्री फुलफळी भागातील रेल्वे रुळावर आत्महत्या केली. हे चित्र पाहून वडील सय्यद गावित यांनीही रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही बातमी वाऱ्या सारखी पसरताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले होते.

सकाळी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालयात आणले होते पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं सहकारी युवराज परदेशी,विकी वाघ, हे करीत आहेत