पूलवाम्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

अवंतीपुरा: आज जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. सकाळपासून ही चकमक सुरु होती. अवंतीपुरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी त्याचा शोध घेतला. त्यानंतर चकमक उडाली. यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.