VIDEO: निशस्त्र जवानांचा जीव कोणी धोक्यात घातला?: राहुल गांधींचा सवाल

0

नवी दिल्ली: गलवान भागात भारतीय आणि चिनी सैनिकांच्या जोरदार संघर्ष झाला, यात 20 भारतीय जवान शहीद झालेत. त्यानंतर आता यावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यावर विविध सवाल उपस्थित केले आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत शहीद जवानांच्या मृत्यूबद्दल सवाल उपस्थित केला आहे.

कौन ज़िम्मेदार है? https://t.co/UsRSWV6mKs

‘चीनने निशस्त्र भारतीय जवानांची हत्या करून मोठा अपराध केला आहे, वीर जवानांना विना शस्त्र सीमेवर कोणी पाठविले?, विना शस्त्र जवानांचा जीव कोणी धोक्यात घातले?, या घटनेला कोण जबाबदार आहे? यासह अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले .